Subscribe Us

header ads

BIT कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
अपघात नसून घातपात असल्याचा कुटुंबियांचा आरोप

चंद्रपूर जिल्ह्यातील बामणी येथील बल्लारपूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात लॅब असिस्टंट पदावर कार्यरत असलेले अमर नगराळे यांचा अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत मृत्यू झाला आहे. हि घटना मंगळवारी रात्री 10.30वाजताच्या दरम्यानबामणी कोठारी मार्गावर घडली.
गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नसल्यानं हा कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला होता, असं सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.होते.त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून कर्मचाऱ्यांनी आज मृतदेह महाविद्यालयात ठेऊन न्यायाची मागणी केली. या प्रकारामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली.

महाविद्यालयातील सुमारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन संस्थेमार्फत नियमित मिळत नसल्याने मागील अनेक दिवसांपासून या संस्थेत संस्थेतील कर्मचाऱ्यांचा व संस्था अध्यक्ष व्यवस्थापनाचा वाद सुरू होता.कर्मचाऱ्यांनी संस्था अध्यक्षांना वारंवार वेतनाचे पैसे मागितले मात्र ते देत नसल्यामुळे विविध पद्धतीने कर्मचारी हे आंदोलन करू लागले. या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व अमर नगराळे करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार मागील आठ महिन्यांपासून संस्थेतील अनेक कर्मचाऱ्यांचे वेतन नसल्यानं कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत ते होते. त्यातच त्यांचा काल अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे असे बोलल्या जात आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी ते झटत असल्यानं त्यांना मारण्यात आलं, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी केला आहे.या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी अमर नगराळेंचा मृतदेह आज संस्थाप्रमुख बाबासाहेब वासाडे यांच्या केबिनमध्ये आणला आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिथेच ठेवण्याचा इशारा दिला.आता या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या