गडचांदूर#Gadchandur news.
औद्योगिक शहराच्या नावाने जगप्रसिद्ध कोरपना तालुक्यातील मोठे व नावाजलेले शहर गडचांदूर,हे दोन तालुक्याच्या मध्यभागी व जास्त लोकसंख्येचे शहर आहे.मोठी बाजारपेठ,शाळा,महाविद्यालय,शासकीय, निमशासकीय कार्यालय,बँका असल्याने विविध कामानिमित्त हजारो नागरिक दररोज याठिकाणी येतात.परंतू या नावाजलेल्या शहरात बसस्थानक नसल्याने हे शहर "बसस्थानक विना पोरके!" असल्याची भावना व्यक्त होत असून 'अखेर किती दिवस भोगायची ही नरक यातना' असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहे.याठिकाणी बसस्थानकाच्या नावाखाली प्रवासी निवारे उभारून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली गेली.नागरिकांना होणाऱ्या त्रासाने परिसीमा गाठली असून सर्व सुविधा युक्त,सुसज्ज असे बसस्थानकाचे सूख केव्हा मिळणार हा मात्र संशोधनाचा विषय ठरला आहे.
बसस्थानक अभावी येथे येणार्या जाणाऱ्यांची मोठी गैरसोय होत असून तीनही ऋतूत बसच्या प्रतिक्षेत बिचाऱ्या निष्पाप लोकांवर इकडे-तिकडे उभे राहण्याची नामुष्की ओढावली आहे.विशेषता: चिमुकल्या बाळांची माता,वयोवृद्ध स्त्री,पुरूष व लहानमोठे शालेय विद्यार्थ्यांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.जनता इतक्या बिकट परिस्थतीचा सामना करीत असताना लोकप्रतिनिधींनी याविषयी अघोषित चुप्पी साधल्याचे दिसत आहे. लोकांची गर्दी पाहता येथे मोठे व सूसज्ज बसस्थानक होणे अत्यंत गरजेचे आहे मात्र असे होताना दिसत नाही.बसस्थानक नसल्यामुळे नाईलाजास्तव लोकांना प्रसाधनगृहापुढे बसून बसची वाट पहावी लागत असल्याचे विदारक चित्र पहायला मिळत आहे. जनतेला सुविधा पुरविण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते मात्र याठिकाणी वेगळेच चित्र दिसत आहे.भव्य-दिव्य स्वप्न दाखवून जनतेच्या तोंडाला पाने पूसणे,हाच एककलमी कार्यक्रम आजपर्यंत सुरू असून सध्याची परिस्थिती लक्षात घेता "गडचांदूर शहर हे बसस्थानक विना पोरके" असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
-------//-------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मूम्ताज़ अली.
0 टिप्पण्या