गडचांदूर:-#gadchandur news.
कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या प्रभाग क्रमांक 5 वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी विलास वासुदेव मांडवकर वयवर्ष अंदाजे 50 यांनी आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर रोजी समोर आली असून सदर घटना शेत विक्रीच्या व्यवहारातून घडल्याचे विलास यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या 'सुसाईड नोट' suicide note च्या मजकुरातून कळते.'शरद जोगी आणि प्रशांत पाचभाई या दोघांमूळे आपली आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट मत मृत विलास यांनी त्या चिठ्ठीमध्ये मांडले असून यांना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मनोज शर्मा नामक एका व्यक्ती सोबत 5 एकर जमीनचा 60 लाखात सौदा केला होता.आणि जी जमीन रोडमध्ये जात आहे त्याचा मोबदला आम्हाला मिळावा असे म्हटले होते.आमचे सोबत असलेले दिनेश सोनी,मनोज शर्मा,बाळू घायवनकर,गजानन, पंकज...यांनी आमचे आई-वडिलांकडून 11.5 एकरची रजिस्ट्री करून घेतली.....मध्ये प्रशांत पाचभाई यांनी मला कुठेही जाऊ दिले नाही.कारण शरद यांनी प्रशांत पाचभाई याला पैशाचे आमिष दाखवून आमच्या कडून काम करून घेत होता.(सुसाईड नोटमधील काही मजकूर अस्पष्ट आहे) तर अशाप्रकारे मृत विलास यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
'वडगाव साईडला आमच्या आजीच्या नावाने 11 एकर जमीन होती.5 एकर विकतो म्हणून शरद जोगी सोबत सौदा केला आणि 11 एकरची जमीन रजिस्ट्री करून घेतली.चेकद्वारे पैसे दिले.आणि ते चेक वापस द्या, असा दबाव टाकला आमच्यावर.आम्ही नाही म्हणालो, दबाव टाकून एक चेक नेला.यानंतर पुन्हा दबाव टाकून जो चेक आम्ही जमा केला होता तो चेक सुद्धा आम्हाला वापस द्या असे म्हणत होते आणि नाही दिल्यास तुझ्या पोराला मारून टाकीन असे धमक्या देत होते.याच कारणाणे आज बाबाने विष पेवून आपले जीवन संपवले.' असे मृत विलासच्या मुलाने म्हटले आहे.दरम्यान नातेवाईकांनी विलासचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून या दोघांना त्वरित अटक करा अन्यथा प्रेत उचलणार नाही,असा इशारा दिला होता.
'शरद जोगी आणि पोतनूरवार यांनी जमीन खरेदी केली होती.आमचे पैसे वापस करा म्हणून शरद जोगी आणि पाचभाई धमकी देत होते.आम्ही नाही म्हटले तर यांना(पतीला)धमकी देत होते.तुमच्या मुलाला काही करीन,म्हणून यांना असं करावं लागलं.यांच्या मुळेच यांनी विष पेले' असे मृत विलासच्या पत्नीने म्हटले आहे.
----------//--------
'सदर घटने संदर्भातील कागदपत्रे गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये नाही.चंद्रपूर येथे यांचा मृत्यू झाला.PM सुद्धा तिथेच झालं.फक्त सुसाईड नोट यांनी आता आम्हाला दाखवली.याच्या सखोल व निष्पक्ष चौकशीसाठी अधिकारी नेमण्यात येईल आणि PM रिपोर्ट आल्यावर त्यातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.सध्या बयान नोंदविण्यात येत आहे. रिपोर्ट आल्याशिवाय काहिच करता येणार नाही.'
'सत्यजित आमले'
ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर.
-------//---------
'दरम्यान मृत विलासचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून या दोघांना आत्ताच अटक करा,अन्यथा प्रेत उचलणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता.भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार,निलेश ताजने,नगरसेवक अरविंद डोहे,शिवसेना गटनेता तथा नगरसेवक सागर ठाकूरवार,काँग्रेसचे चुदरी,मृत विलासचा मुलगा व एका नातेवाईकासोबत ठाणेदार आमले यांनी सविस्तर चर्चा करून PM रिपोर्ट आल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि प्रेत उचलण्यात आले.रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
--------//---------
'शरद जोगी हे गडचांदूर नगरपरिषदेत उपाध्यक्षपदी विराजमान असून मागील अंदाजे 8,10 वर्षापासून जमीन खरेदी,विक्रीचा व्यवसाय करीत आहे.शहर व शहरा बाहेर यांनी आदिवासी,गैर आदिवासींचे कृषक जमीनी कवडीमोल भावाने खरेदी करून स्वतः प्लॉट पाडले आणि गरजूंना 100 रुपयांच्या स्टैंप पेपरवर विक्री केले.एक प्लॉट अनेकांना विकले,उपनगराध्यक्ष असल्याने रोड,नाली,लाईट,पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतो,न.प.च्या रेकॉर्डवर नोंदणी करून देतो,असे एकना अनेक आश्वासन देऊन प्लॉट विकून मोकळे झाले.आणि प्लॉट धारकांनी विचारल्यावर उलट त्यांनाच धमकावणे सर्रस सुरू असल्याचे आरोप संबंधितांकडून होत आहे.आजही कित्येक प्लॉट खरेदी करणारे आश्वासन दिलेल्याप्रमाणे सुविधांपासून वंचित आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र काहीच होत नसल्याची खंत काही प्लॉट धरक व्यक्त करत होते.विलास प्रकरणी असाच काही प्रकार घडला असावा म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला अशी चर्चा पोलीस स्टेशन येथे उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती.काही सहकाऱ्यांच्या मदतीने गोरगरीब आदिवासींची जमीनी घेणे आणि स्टैंप पेपरवर विकून शासनाचा महसूल बुडवणे हाच एककलमी कार्यक्रम शरद जोगी राबवित असल्याची चर्चा या प्रकरणावरून शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत असली तरी यामध्ये खरे काय आणि खोटे काय ? हा संशोधनाचा विषय ठरला आहे.ठाणेदार आमले यांनी दोन पंचा समोर विलासच्या मुलाने दिलेल्या सुसाईड नोट जमा केली आहे.सदर प्रकरणात ऐवढ्या मोठ्या व्यक्तीचा नाव आल्यामुळे येणाऱ्या PM रिपोर्ट मधून काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सदर प्रकरणी प्रतिक्रिया घेण्यासाठी जोगी यांना दूरध्वनीवरून संपर्क करण्यात आला पण संपर्क झाला नाही.
----------//---------
'कोरपनाLive' मुख्यसंपादक,सै.मुम्ताज़ अली.
0 टिप्पण्या