Subscribe Us

header ads

'जलयुक्त शिवार' योजना पुन्हा होणार सुरू.Jalyukt Shivar Abhiyaan.

मुंबई:-@Jalyukt Shivar Abhiyaan.
   महाराष्ट्र राज्यात नेहमीच होणाऱ्या पाणी टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन 'पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019' या योजनेंतर्गत 'जलयुक्त शिवार' Jalyukt Shivar नावाचे एक अभियान महाराष्ट्र सरकारने 2014 सालच्या डिसेंबरमध्ये सुरू केले. Maharashtra Government has launched the project "Jalyukt Shivar Abhiyaan" in a bid to make Maharashtra a drought-free state by 2019.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाने शेतीसाठी उपयुक्त ठरलेली जलयुक्त शिवार Jalyukt Shivar ही महत्त्वाची योजना पुन्हा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून आपण या निर्णयाचे स्वागत करतो,अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.ते म्हणाले की,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण भाग आणि शेतीच्या विकासासाठी जलयुक्त शिवार ही अत्यंत कल्पक आणि प्रभावी योजना सुरू केली.जनतेच्या सहभागातून सदर योजना यशस्वी ठरली.
त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी राखण्यास मदत झाली आणि सिंचनाच्या क्षमतेत वाढ झाली.तथापि, 2019 च्या विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टी महायुतीने विजय मिळविला असताना विश्वासघाताने सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जलयुक्त शिवार या अत्यंत उपयुक्त योजनेला स्थगिती दिली.ही योजना बदनाम करण्याचाही प्रयत्न केला.तथापि,आता पुन्हा ही Jalyukt Shivar योजना सुरू होत असल्याने ग्रामीण भाग आणि शेतीला लाभ होणार आहे.आपण या निर्णयाबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन करतो.त्यांनी सांगितले की,स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदांच्या भरती प्रक्रियेला चालना देण्याचा निर्णय राज्यातील युवक-युवतींसाठी आश्वासक आहे.पुणे जिल्ह्यातील शिवसृष्टी प्रकल्पाला 50 कोटी रुपये अनुदान देणे आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात 60 टक्के वाढ करणे हे निर्णय स्वागतार्ह आहे.
Maharashtra Government has launched the project "Jalyukt Shivar Abhiyaan"
                        --------//--------
मुख्य संपादकसै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या