News@मराठी माणूस...
“कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल,मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल,तर हे खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी MNS President Raj Thackeray कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन जारी करून दिला आहे.राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे.तिथल्या सीमा भागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की,मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्याही पक्षाचा का असेना,तो फक्त मराठी असायला हवा आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय,या विरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.” राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही ज्या राज्याचे आहात,त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृतीचा आदर केलाच पाहिजे,या ठाम मताचा मी आहे.सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृतीचा मान राखत आले आहेत.पण तरीही तिथले सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल,मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही," असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Raj Thackeray's warning in the wake of Karnataka elections...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.
“कर्नाटकमधील सरकार मराठी माणसांना त्रास देणार असेल,मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल,तर हे खपवून घेतला जाणार नाही,” असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी MNS President Raj Thackeray कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवेदन जारी करून दिला आहे.राज ठाकरे म्हणाले, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे.तिथल्या सीमा भागातील माझ्या मराठी मतदार बंधू-भगिनींना माझे आवाहन आहे की,मतदान करताना एकजुटीने मराठी उमेदवारालाच मतदान करा. उमेदवार कुठल्याही पक्षाचा का असेना,तो फक्त मराठी असायला हवा आणि त्याने निवडून आल्यावर मराठी भाषेची सुरू असलेली गळचेपी, मराठी माणसांवर सुरू असलेला वर्षानुवर्षांचा अन्याय,या विरोधात तिथल्या विधानभवनात वाचा फोडायलाच हवी.” राज ठाकरे म्हणाले, “तुम्ही ज्या राज्याचे आहात,त्या राज्याची भाषा, तिथली संस्कृतीचा आदर केलाच पाहिजे,या ठाम मताचा मी आहे.सीमाभागात कित्येक पिढ्या राहणारे बांधव कन्नड भाषा आणि इथली संस्कृतीचा मान राखत आले आहेत.पण तरीही तिथले सरकार जर मराठी माणसांना त्रास देणार असेल,मराठी भाषेची गळचेपी करण्याचा प्रयत्न करणार असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही," असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
Raj Thackeray's warning in the wake of Karnataka elections...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.
0 टिप्पण्या